सिमेंट नाला बांध
ज्या ठिकाणी माती नालाबांध तांत्रिकदृष्ट्या घेता येत नाही अशा ठिकाणी दगड, सिमेंट व वाळू यामध्ये पक्के बांधकाम करून सिमेंट नालाबांध तयार करतात. यामुळे पावसाचे पाणी जागीच जमिनीत मुरविण्यास मदत होते.
सिमेंट नालाबांधामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा वाढलेला असून त्यामुळे अनेक विहिरींतील पाण्याची पातळी तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. नालाबांधातील साठलेले पाणी उपसून पिकाला दिल्यामुळे त्या पाणलोटातील बरेचसे क्षेत्र बागायती झालेले आहे. त्यामुळे दिवसें दिवस सिमेंट नाला बांधाचे महत्त्व शेतकर्यांना लक्षात आले आहे.
सिमेंट नालाबांधामुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविले जाते. भूपृष्ठावरून वाहणार्या पाण्याची गती कमी होते. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते, सिंचन क्षेत्रात वाढ होते, बांधाच्या प्रभाव प्रक्षेत्रातील विहिरीची पाणी पातळी वाढते आणि पिकांना संरक्षित पाणी देता येते इ. फायदे होतात.
नाला बांधामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढून जवळपासच्या विहिरीतील आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. भूपृष्ठावरून वाहणार्या पाण्याची गती कमी करून जमिनीची धूप थांबविणे तसेच बांधाच्या प्रभावक्षेत्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे आणि त्याद्वारे सिंचन क्षेत्रात वाढ करणे हे सिमेंट नाला बांधाचे उद्देश असतात. बांधकामासाठी सिमेंट नाला बांध सोपे असतात. मात्र सिमेंट नाला बांध ज्या ठिकाणी बांधावयाचा असतो तेथे पक्क्या खडकाचा पाया आणि स्थिर नालातळ व नालाकाठ आवश्यक आहे.
जागेची निवड
१) पाणलोट क्षेत्र ४० हेक्टरपासून १००० हेक्टरपर्यंत असावे.
२) नाल्याच्या तळाचा उतार तीन टक्केपेक्षा जास्त असू नये व तळाची रुंदी ३० मी.पेक्षा जास्त असू नये.
३) ज्या ठिकाणी बांधाची जागा पक्की करावयाची आहे, अशा ठिकाणी नाल्याचे तळात पाणीसाठा उंचीच्या निम्म्या उंची इतक्या खोलीपर्यंत १/२ पक्का खडक लागत असेल तरच जागा निवडावी.
४) सिमेंट नालाबांध गाळाने भरू नये म्हणून गाळ प्रतिबंध कामे प्रथम पूर्ण करावीत.
सिमेंट नालाबांधामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा वाढलेला असून त्यामुळे अनेक विहिरींतील पाण्याची पातळी तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. नालाबांधातील साठलेले पाणी उपसून पिकाला दिल्यामुळे त्या पाणलोटातील बरेचसे क्षेत्र बागायती झालेले आहे. त्यामुळे दिवसें दिवस सिमेंट नाला बांधाचे महत्त्व शेतकर्यांना लक्षात आले आहे.
सिमेंट नालाबांधामुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविले जाते. भूपृष्ठावरून वाहणार्या पाण्याची गती कमी होते. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते, सिंचन क्षेत्रात वाढ होते, बांधाच्या प्रभाव प्रक्षेत्रातील विहिरीची पाणी पातळी वाढते आणि पिकांना संरक्षित पाणी देता येते इ. फायदे होतात.
नाला बांधामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढून जवळपासच्या विहिरीतील आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. भूपृष्ठावरून वाहणार्या पाण्याची गती कमी करून जमिनीची धूप थांबविणे तसेच बांधाच्या प्रभावक्षेत्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे आणि त्याद्वारे सिंचन क्षेत्रात वाढ करणे हे सिमेंट नाला बांधाचे उद्देश असतात. बांधकामासाठी सिमेंट नाला बांध सोपे असतात. मात्र सिमेंट नाला बांध ज्या ठिकाणी बांधावयाचा असतो तेथे पक्क्या खडकाचा पाया आणि स्थिर नालातळ व नालाकाठ आवश्यक आहे.
जागेची निवड
१) पाणलोट क्षेत्र ४० हेक्टरपासून १००० हेक्टरपर्यंत असावे.
२) नाल्याच्या तळाचा उतार तीन टक्केपेक्षा जास्त असू नये व तळाची रुंदी ३० मी.पेक्षा जास्त असू नये.
३) ज्या ठिकाणी बांधाची जागा पक्की करावयाची आहे, अशा ठिकाणी नाल्याचे तळात पाणीसाठा उंचीच्या निम्म्या उंची इतक्या खोलीपर्यंत १/२ पक्का खडक लागत असेल तरच जागा निवडावी.
४) सिमेंट नालाबांध गाळाने भरू नये म्हणून गाळ प्रतिबंध कामे प्रथम पूर्ण करावीत.