आच्छादनाचा वापर
बाष्पीभवनामुळे भूपृष्ठावरून जमिनीतील ७० टक्के ओल निघून जाते. ती थोप विण्यासाठी शेतात उभ्या पिकात दोन ओळींमध्ये काडी कचरा, पालापाचोळा, गवत, पाचट, तुरकाट्या, ज्वारीची धसकटे, वाळलेले गवत इ. सेंद्रिय पदार्थांचा जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादन करण्यास वापर करावा. त्यामुळे जमिनीतील ओला दीर्घकाळ टिकून २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते. शिवाय तणनियंत्रणही होते. पिकाची उगवण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत हेक्टरी पाच टन इतका सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या पृष्ठभागावर दोन ते अडीच सें.मी. जाडीचा थर पसरावा. त्यामुळे जमीन भेगाळण्याची क्रिया कमी होते.
आच्छादनामुळे पिकास 35 ते 50 मिलिमीटर ओलावा अधिक मिळतो. स्तंभ आच्छादन करूनही जमिनीतील ओलावा साठविता येतो. त्यासाठी जमिनीत चार मीटर अंतरावर उतारास आडवे 20 सें.मी. रुंद व 60 सें.मी. खोल वर काढावेत. त्यामध्ये ज्वारीची धसकटे आणि तुरकाट्या उभ्या कराव्यात, त्यामुळे जमिनीतून वाहणार्या पाण्याला अडथळा येतो आणि जमिनीत जास्त ओलाव्याची साठवण होते.
बाष्पीभवनामुळे भूपृष्ठावरून जमिनीतील ७० टक्के ओल निघून जाते. ती थोप विण्यासाठी शेतात उभ्या पिकात दोन ओळींमध्ये काडी कचरा, पालापाचोळा, गवत, पाचट, तुरकाट्या, ज्वारीची धसकटे, वाळलेले गवत इ. सेंद्रिय पदार्थांचा जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादन करण्यास वापर करावा. त्यामुळे जमिनीतील ओला दीर्घकाळ टिकून २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते. शिवाय तणनियंत्रणही होते. पिकाची उगवण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत हेक्टरी पाच टन इतका सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या पृष्ठभागावर दोन ते अडीच सें.मी. जाडीचा थर पसरावा. त्यामुळे जमीन भेगाळण्याची क्रिया कमी होते.
आच्छादनामुळे पिकास 35 ते 50 मिलिमीटर ओलावा अधिक मिळतो. स्तंभ आच्छादन करूनही जमिनीतील ओलावा साठविता येतो. त्यासाठी जमिनीत चार मीटर अंतरावर उतारास आडवे 20 सें.मी. रुंद व 60 सें.मी. खोल वर काढावेत. त्यामध्ये ज्वारीची धसकटे आणि तुरकाट्या उभ्या कराव्यात, त्यामुळे जमिनीतून वाहणार्या पाण्याला अडथळा येतो आणि जमिनीत जास्त ओलाव्याची साठवण होते.