ओहोळ बांध - गली प्लग
पाणलोट क्षेत्रातून वरच्या भागाकडून पावसाचे पाणी ओहोळामधून वाहत येते. याला अडथळा निर्माण करण्यासाठी या ओहोळांमध्ये कमी उंचीचे बंधारे तयार करतात. परंतु बर्याच भागात हे बंधारे फुटलेले दिसतात. याची कारणे अनेक आहेत. या भागात जनावरे चरत असतात, त्या वेळेस काही लोक गंमत म्हणून रचलेले दगड - गोटे काढून टाकतात. कधी कधी जनावरांच्या पायानेही रचलेले दगड - गोटे हालतात आणि हे दगड सुटे होतात.
पाण्याच्या वेगाने हे सुटे झालेले दगड खालच्या दिशेने वाहून जातात. हे नुकसान लक्षात घेऊन गावातील पाणलोट क्षेत्रात सहभागी असलेल्या शेतकर्यांनी, मंत्र्यांनी किंवा ग्रामपंचायतीने दरवर्षी या बंधार्याची पाहणी करून सुटे झालेले दगड, गोटे पुन्हा व्यवस्थित बसविणे जरुरीचे आहे.
बर्याच पाणलोट क्षेत्रात पाणलोट विकास समिती असते. अशा समितीने याकडे लक्ष द्यावे. शासनाचे अनुदान या कामाकरिता नसल्यास गावकर्यांनी श्रमदान करून या बंधार्याची तसेच इतर कामांची देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी. जेणेकरून दीर्घकाळपर्यंत याचा फायदा होईल. दीर्घकाळ हे बंधारे टिकून राहण्यासाठी, असे बंधारे तयार करतानाच बंधार्याच्या खालच्या भागात ५० सें.मी. x ५० सें.मी. अंतराने घायपाताच्या दोन ओळी लावाव्यात. त्यामुळे बंधार्याला आधार मिळतो. कालांतराने एक नवीन जैविक बांध तेथे तयार होऊन मूळ बंधार्याला संरक्षण मिळेल.
पाणलोट क्षेत्रातून वरच्या भागाकडून पावसाचे पाणी ओहोळामधून वाहत येते. याला अडथळा निर्माण करण्यासाठी या ओहोळांमध्ये कमी उंचीचे बंधारे तयार करतात. परंतु बर्याच भागात हे बंधारे फुटलेले दिसतात. याची कारणे अनेक आहेत. या भागात जनावरे चरत असतात, त्या वेळेस काही लोक गंमत म्हणून रचलेले दगड - गोटे काढून टाकतात. कधी कधी जनावरांच्या पायानेही रचलेले दगड - गोटे हालतात आणि हे दगड सुटे होतात.
पाण्याच्या वेगाने हे सुटे झालेले दगड खालच्या दिशेने वाहून जातात. हे नुकसान लक्षात घेऊन गावातील पाणलोट क्षेत्रात सहभागी असलेल्या शेतकर्यांनी, मंत्र्यांनी किंवा ग्रामपंचायतीने दरवर्षी या बंधार्याची पाहणी करून सुटे झालेले दगड, गोटे पुन्हा व्यवस्थित बसविणे जरुरीचे आहे.
बर्याच पाणलोट क्षेत्रात पाणलोट विकास समिती असते. अशा समितीने याकडे लक्ष द्यावे. शासनाचे अनुदान या कामाकरिता नसल्यास गावकर्यांनी श्रमदान करून या बंधार्याची तसेच इतर कामांची देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी. जेणेकरून दीर्घकाळपर्यंत याचा फायदा होईल. दीर्घकाळ हे बंधारे टिकून राहण्यासाठी, असे बंधारे तयार करतानाच बंधार्याच्या खालच्या भागात ५० सें.मी. x ५० सें.मी. अंतराने घायपाताच्या दोन ओळी लावाव्यात. त्यामुळे बंधार्याला आधार मिळतो. कालांतराने एक नवीन जैविक बांध तेथे तयार होऊन मूळ बंधार्याला संरक्षण मिळेल.