सलग दगडी समतल बांध
उद्दिष्ट्ये
1) वाहून जाणारे पाणी रोखणे.
2) जमिनीची धूप थांबविणे.
3) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे.
संरचना
उथळ (जमिनीची खोली 10 सें. मी. किंवा त्यापेक्षा कमी) व 40 टक्केपेक्षा कमी उतार असलेल्या जमिनीवर या प्रकारचे बांध बांधले जातात. त्यामुळे अतिवृष्टीपासून होणारी जमिनीची धूप थांबते. या प्रकारच्या बांधामध्ये विखुरलेले दगडी बांध, सपाट ओटे आणि विखुरलेले चर बांधल्यास पावसाचे पाणी कार्यक्षमरीत्या वापरले जाऊ शकते. दोन बंधार्यातील अंतर जमिनीच्या उतारानुसार ठरवले जाते. पण सामान्यत: 20 टक्के पर्यंत उतार असलेल्या जमिनीवर 0.5 मी. रुंद, 0.5 मी. उंचीचे बंधारे 2 मी. अंतरावर बांधले जातात. एका वर्षाच्या कालावधीत दगडातील पोकळी गाळाने भरून जाते व बांधाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
कार्यपद्धती विवरण
बंधार्यातील वरील बाजुकडील दगड गोटे जमा करून समतल रेषेवर बंधारा तयार करावा. त्यामुळे दोन बंधार्याच्या मधील जमिनीवरील दगड गोटे साफ होऊन ती जमीन वैरण आणि झाडे लावण्या करिता उपयोगात येते. बांधाच्या खालच्या बाजूस रोपे लावावी कारण त्या ठिकाणी जमिनीत ओलावा जास्त असतो आणि बंधार्यामुळे तेथे गवत व तणांचे बी रुजत नाही. त्यामुळे रोप आणि तण यांच्यातील मूलद्रव्यांसाठी स्पर्धा टळते. दोन बांधांमधील जमिनीवर चार्याचे गवत पेरावे. त्याप्रमाणे बांध टाकावेत. इतर पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीत ओलावा कमी असल्यामुळे रोपांच्या वाढीस थोडा जास्त कालावधी लागतो.
उद्दिष्ट्ये
1) वाहून जाणारे पाणी रोखणे.
2) जमिनीची धूप थांबविणे.
3) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे.
संरचना
उथळ (जमिनीची खोली 10 सें. मी. किंवा त्यापेक्षा कमी) व 40 टक्केपेक्षा कमी उतार असलेल्या जमिनीवर या प्रकारचे बांध बांधले जातात. त्यामुळे अतिवृष्टीपासून होणारी जमिनीची धूप थांबते. या प्रकारच्या बांधामध्ये विखुरलेले दगडी बांध, सपाट ओटे आणि विखुरलेले चर बांधल्यास पावसाचे पाणी कार्यक्षमरीत्या वापरले जाऊ शकते. दोन बंधार्यातील अंतर जमिनीच्या उतारानुसार ठरवले जाते. पण सामान्यत: 20 टक्के पर्यंत उतार असलेल्या जमिनीवर 0.5 मी. रुंद, 0.5 मी. उंचीचे बंधारे 2 मी. अंतरावर बांधले जातात. एका वर्षाच्या कालावधीत दगडातील पोकळी गाळाने भरून जाते व बांधाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
कार्यपद्धती विवरण
बंधार्यातील वरील बाजुकडील दगड गोटे जमा करून समतल रेषेवर बंधारा तयार करावा. त्यामुळे दोन बंधार्याच्या मधील जमिनीवरील दगड गोटे साफ होऊन ती जमीन वैरण आणि झाडे लावण्या करिता उपयोगात येते. बांधाच्या खालच्या बाजूस रोपे लावावी कारण त्या ठिकाणी जमिनीत ओलावा जास्त असतो आणि बंधार्यामुळे तेथे गवत व तणांचे बी रुजत नाही. त्यामुळे रोप आणि तण यांच्यातील मूलद्रव्यांसाठी स्पर्धा टळते. दोन बांधांमधील जमिनीवर चार्याचे गवत पेरावे. त्याप्रमाणे बांध टाकावेत. इतर पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीत ओलावा कमी असल्यामुळे रोपांच्या वाढीस थोडा जास्त कालावधी लागतो.