चिबड जमीन सुधारणा
पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जमीनीतील जादा झालेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत आवश्यक आहे. बर्याच ठिकाणी भुपृष्ठ व भुस्तराच्या विशिष्ट रचनेमुळे वहितीखालील जमिनीच्या काही भागात वर्षातील काही महिने पाणी साचून राहिल्यामुळे पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. पिके पिवळी पडू लागतात आणि पर्यायाने पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
चिबड जमीन सुधारणेमध्ये कोरडवाहू क्षेत्रात जमिनीच्या पृष्ठभागावर व भूपृष्ठाखाली चर खोदून जादा पाण्याचा निचरा करून जमीन सुधारणे अभिप्रेत आहे.
मुख्य चर
मुख्य चर - 65 मी./हेक्टर लांबी
पाया - 0.60 मी.
माथा - 3.60 मी.
उंची - 1.20 मी.
बाजू उतार - 1:1.25
छेद - 2.52 चौ.मी.
उप चर
उप चर - 140 मी./हेक्टर लांबी
पाया - 0.60 मी.
माथा - 2.85 मी.
उंची - 0.90 मी.
बाजू उतार - 1:1.25
छेद - 1.55 चौ.मी.
1) जमिनीतील क्षारांचा निचरा करण्यासाठी जमिनीची ठेवण लक्षात घेऊन योग्य अंतरावर चर खोदावेत, व नाले खोल खणून जमिनीतील पाण्याची पातळी वाढू देऊ नये. साधारण रेवट पोयटा किंवा पोयट्याच्या जमिनीत काही ठिकाणी भारी मातीचे तुकडे आढळतात, त्यामधून क्षार सहजपणे निचरा होऊन नाहीसे होत नाहीत. अशा वेळी त्या तुकड्यांच्या भोवती छोटा बांध घालून त्यात पाणी जास्त काळ साठवून ठेवल्यास क्षारांचा योग्य निचरा होण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे मुख्य चर दोन मीटर खोलीपर्यंत काढावा व बाजूचे चर एक ते दीड मीटर खोलीपर्यंत काढावेत. दोन चरांमधील अंतर भारी काळ्या जमिनीत 30 मीटर आणि मध्यम काळ्या जमिनीत 60 मीटर ठेवावे. मुख्य चरामध्ये प्लॅस्टिक अथवा सिमेंटचा 30 सें.मी. व्यासाचा पाइप वापरावा. बाजूच्या चरांमध्ये दगडगोट्यांचा थर द्यावा आणि त्यावर वाळूचा व नंतर बारीक वाळूचा थर देऊन त्यावर माती टाकावी आणि जमीन सपाट करून घ्यावी.
2) जेथे अतिशय क्षारयुक्त जागा असतील, तेथील जमिनीवर जमलेले क्षार खरडून नाल्यात टाकून द्यावेत.
3) पावसाचे पाणी जमिनीवर साठवून किंवा ओलिताच्या पाण्याने क्षारांचा निचरा करावा.
4) हिरवळीच्या व इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा, त्यामुळे जमिनीत पाणी जिरवण्याचा वेग वाढून क्षारांचा चांगला निचरा होण्यास मदत होते.
5) वारंवार कोळपणी व खुरपणी करून किंवा आच्छादन टाकून जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे बाष्पीभवन कमी करता येते, त्यामुळे जमिनीच्या वरच्या थरात क्षारांचे प्रमाण वाढत नाही.
6) पाऊस पडल्यानंतर किंवा ओलिताचे पाणी दिल्यानंतर पेरणी करावी, त्यामुळे जमिनीच्या पृष्ठ भागातील क्षार खालच्या थरात जाऊन पिकांची उगवण व सुरवातीच्या काळातील मुळ्यांची वाढ चांगली होते.
पाणी व्यवस्थापन
पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पिकासाठी आवश्यक असणार्या पाण्यापेक्षा जास्त पाणी दिले जाते. त्यामुळे जितके पाणी जास्त देऊ, तितके जास्त क्षार जमिनीत जातील. यासाठी पाण्याचा मोजून वापर करावा.जलसिंचनासाठी ठिबक सिंचन, फवारा सिंचन, सूक्ष्म फवारा सिंचन, रेन गन इ. चा वापर करावा. विहिरीचे पाणी क्षारयुक्त/ खारट असल्यास ते पाणी शेतीसाठी वापरू नये, त्यासाठी ठिबकचा वापर करावा.
पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जमीनीतील जादा झालेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत आवश्यक आहे. बर्याच ठिकाणी भुपृष्ठ व भुस्तराच्या विशिष्ट रचनेमुळे वहितीखालील जमिनीच्या काही भागात वर्षातील काही महिने पाणी साचून राहिल्यामुळे पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. पिके पिवळी पडू लागतात आणि पर्यायाने पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
चिबड जमीन सुधारणेमध्ये कोरडवाहू क्षेत्रात जमिनीच्या पृष्ठभागावर व भूपृष्ठाखाली चर खोदून जादा पाण्याचा निचरा करून जमीन सुधारणे अभिप्रेत आहे.
मुख्य चर
मुख्य चर - 65 मी./हेक्टर लांबी
पाया - 0.60 मी.
माथा - 3.60 मी.
उंची - 1.20 मी.
बाजू उतार - 1:1.25
छेद - 2.52 चौ.मी.
उप चर
उप चर - 140 मी./हेक्टर लांबी
पाया - 0.60 मी.
माथा - 2.85 मी.
उंची - 0.90 मी.
बाजू उतार - 1:1.25
छेद - 1.55 चौ.मी.
1) जमिनीतील क्षारांचा निचरा करण्यासाठी जमिनीची ठेवण लक्षात घेऊन योग्य अंतरावर चर खोदावेत, व नाले खोल खणून जमिनीतील पाण्याची पातळी वाढू देऊ नये. साधारण रेवट पोयटा किंवा पोयट्याच्या जमिनीत काही ठिकाणी भारी मातीचे तुकडे आढळतात, त्यामधून क्षार सहजपणे निचरा होऊन नाहीसे होत नाहीत. अशा वेळी त्या तुकड्यांच्या भोवती छोटा बांध घालून त्यात पाणी जास्त काळ साठवून ठेवल्यास क्षारांचा योग्य निचरा होण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे मुख्य चर दोन मीटर खोलीपर्यंत काढावा व बाजूचे चर एक ते दीड मीटर खोलीपर्यंत काढावेत. दोन चरांमधील अंतर भारी काळ्या जमिनीत 30 मीटर आणि मध्यम काळ्या जमिनीत 60 मीटर ठेवावे. मुख्य चरामध्ये प्लॅस्टिक अथवा सिमेंटचा 30 सें.मी. व्यासाचा पाइप वापरावा. बाजूच्या चरांमध्ये दगडगोट्यांचा थर द्यावा आणि त्यावर वाळूचा व नंतर बारीक वाळूचा थर देऊन त्यावर माती टाकावी आणि जमीन सपाट करून घ्यावी.
2) जेथे अतिशय क्षारयुक्त जागा असतील, तेथील जमिनीवर जमलेले क्षार खरडून नाल्यात टाकून द्यावेत.
3) पावसाचे पाणी जमिनीवर साठवून किंवा ओलिताच्या पाण्याने क्षारांचा निचरा करावा.
4) हिरवळीच्या व इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा, त्यामुळे जमिनीत पाणी जिरवण्याचा वेग वाढून क्षारांचा चांगला निचरा होण्यास मदत होते.
5) वारंवार कोळपणी व खुरपणी करून किंवा आच्छादन टाकून जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे बाष्पीभवन कमी करता येते, त्यामुळे जमिनीच्या वरच्या थरात क्षारांचे प्रमाण वाढत नाही.
6) पाऊस पडल्यानंतर किंवा ओलिताचे पाणी दिल्यानंतर पेरणी करावी, त्यामुळे जमिनीच्या पृष्ठ भागातील क्षार खालच्या थरात जाऊन पिकांची उगवण व सुरवातीच्या काळातील मुळ्यांची वाढ चांगली होते.
पाणी व्यवस्थापन
पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पिकासाठी आवश्यक असणार्या पाण्यापेक्षा जास्त पाणी दिले जाते. त्यामुळे जितके पाणी जास्त देऊ, तितके जास्त क्षार जमिनीत जातील. यासाठी पाण्याचा मोजून वापर करावा.जलसिंचनासाठी ठिबक सिंचन, फवारा सिंचन, सूक्ष्म फवारा सिंचन, रेन गन इ. चा वापर करावा. विहिरीचे पाणी क्षारयुक्त/ खारट असल्यास ते पाणी शेतीसाठी वापरू नये, त्यासाठी ठिबकचा वापर करावा.