जमीन मशागत पद्धती (सरी पद्धती)
या पद्धतीत मृत सरी, उभ्या पिकांतील सरी, सरी-वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा-सरी, बंदिस्त बांध आदींचा समावेश होतो. या पद्धतीच्या अवलंबनाने क्षेत्रावर कमी-अधिक प्रमाणात उताराला आडवे मातीचे असंख्य वरंबे आणि सर्या निर्माण होतात. वरंब्यामुळे जमिनीवरून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी अडविले जाऊन जमिनीत मुरेपर्यंत सर्यांमध्ये साठविले जाते. बहुतेक पद्धतींमध्ये पाणी जमा होणारी सरीच जास्त पर्जन्यमानाच्या काळात अतिरिक्त पाण्याचे क्षेत्राबाहेर निचरा होण्याकरिता उपयोगात येते. या सर्व पद्धतीमुळे जलसंधारणामध्ये वाढ होऊन मातीचेही संरक्षण होते. मूलस्थानी जलसंधारण केलेल्या क्षेत्रात पावसाच्या खंडाच्या काळात पिकांना ओलाव्याची उपलब्धता राहते.
रुंद वरंबा व सरी पद्धत
या पद्धतीत पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. कमी पाऊस पडला तर सर्यांमध्ये पाणी दीर्घकाळ साठून राहते व ओलावा टिकून राहतो. याउलट जास्त पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी सर्यांमधून निघून जाते व पाण्याचा निचरा होतो. या पद्धतीत जमिनीत हवा, तसेच पाणी यांचे संतुलन राहते. या पद्धतीद्वारे जमिनीची धूप कमी होते व जलसंधारणाचा शेतजमिनीत फायदा होतो.
मध्यम ते भारी जमिनीत खरीप हंगामात बळिराम नांगराने उतारास आडवे तास घालावेत, त्यामुळे जमिनीत सर्या तयार होतात आणि पडणार्या पावसाचे पाणी सर्यांतून जमिनीत मुरते. सर्यांमुळे उताराची लांबी कमी होऊन निरनिराळ्या भागांत विभागली जाते, त्यामुळे वाहून जाणार्या पाण्यास जागोजागी अडथळे निर्माण होतात आणि पाणी जमिनीत मुरते. या पद्धतीत 80 टक्केपर्यंत पाणी जमिनीत मुरते. सर्यांची लांबी साधरणत: 60 मीटपर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे 35 ते 40 टक्के पीक उत्पादनात वाढ दिसून आली.
आडव्या-उभ्या कोळपणीनंतर सर्या काढणे
कापूस, तूर यांसारख्या पिकामध्ये प्रत्येक आडव्या उभ्या कोळपणीनंतर दोन ओळींनंतर सर्या पाडल्यास पावसाचे पाणी जास्त मुरल्यास मदत होते. तणांचा नाश होतो. जमिनीत हवा, पाणी याचे संतुलन राहून पिकांच्या वाढीस मदत होते. पाण्याचा अपघात कमी होतो. म्हणजेच मातीची धूप कमी होते.
सरी वरंबा आणि बंदिस्त सर्या पद्धत
दिवसेंदिवस अनियमित पडणार्या पावसाचे शेतजमिनीत योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून नंतर सर्यांमध्ये छोटेछोटे बांध टाकणे. अशी ही पद्धत आहे. तूर, कापूस, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. इतर सर्व पद्धतींपेक्षा जास्त प्रकारे पावसाचे पाणी या पद्धतीमुळे मुरविता येते. प्रयोगाच्या आधारे ही पद्धत सर्वांत फायदेशीर आढळून आली आहे.
मृत सरी
शेतात उताराला आडव्या दिशेने दहा मीटर अंतरावर ४५ ते ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल त्रिकोणी आकाराच्या सरी बैलचलित नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी उन्हाळ्यात काढाव्यात. त्या सरीस ०.२ ते ०.४ टक्के उतार दिल्यास अति पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी उपयोगी पडते. दोन सरींमधील क्षेत्रातील पावसाचे पाणी सरीमध्ये साठविले जाते व जमिनीत मुरते. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखण्यात येते. ओळीत पेरण्यात येणार्या आंतरपीक पद्धतीकरिता ही पद्धत उपयोगी आहे.
या पद्धतीत मृत सरी, उभ्या पिकांतील सरी, सरी-वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा-सरी, बंदिस्त बांध आदींचा समावेश होतो. या पद्धतीच्या अवलंबनाने क्षेत्रावर कमी-अधिक प्रमाणात उताराला आडवे मातीचे असंख्य वरंबे आणि सर्या निर्माण होतात. वरंब्यामुळे जमिनीवरून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी अडविले जाऊन जमिनीत मुरेपर्यंत सर्यांमध्ये साठविले जाते. बहुतेक पद्धतींमध्ये पाणी जमा होणारी सरीच जास्त पर्जन्यमानाच्या काळात अतिरिक्त पाण्याचे क्षेत्राबाहेर निचरा होण्याकरिता उपयोगात येते. या सर्व पद्धतीमुळे जलसंधारणामध्ये वाढ होऊन मातीचेही संरक्षण होते. मूलस्थानी जलसंधारण केलेल्या क्षेत्रात पावसाच्या खंडाच्या काळात पिकांना ओलाव्याची उपलब्धता राहते.
रुंद वरंबा व सरी पद्धत
या पद्धतीत पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. कमी पाऊस पडला तर सर्यांमध्ये पाणी दीर्घकाळ साठून राहते व ओलावा टिकून राहतो. याउलट जास्त पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी सर्यांमधून निघून जाते व पाण्याचा निचरा होतो. या पद्धतीत जमिनीत हवा, तसेच पाणी यांचे संतुलन राहते. या पद्धतीद्वारे जमिनीची धूप कमी होते व जलसंधारणाचा शेतजमिनीत फायदा होतो.
मध्यम ते भारी जमिनीत खरीप हंगामात बळिराम नांगराने उतारास आडवे तास घालावेत, त्यामुळे जमिनीत सर्या तयार होतात आणि पडणार्या पावसाचे पाणी सर्यांतून जमिनीत मुरते. सर्यांमुळे उताराची लांबी कमी होऊन निरनिराळ्या भागांत विभागली जाते, त्यामुळे वाहून जाणार्या पाण्यास जागोजागी अडथळे निर्माण होतात आणि पाणी जमिनीत मुरते. या पद्धतीत 80 टक्केपर्यंत पाणी जमिनीत मुरते. सर्यांची लांबी साधरणत: 60 मीटपर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे 35 ते 40 टक्के पीक उत्पादनात वाढ दिसून आली.
आडव्या-उभ्या कोळपणीनंतर सर्या काढणे
कापूस, तूर यांसारख्या पिकामध्ये प्रत्येक आडव्या उभ्या कोळपणीनंतर दोन ओळींनंतर सर्या पाडल्यास पावसाचे पाणी जास्त मुरल्यास मदत होते. तणांचा नाश होतो. जमिनीत हवा, पाणी याचे संतुलन राहून पिकांच्या वाढीस मदत होते. पाण्याचा अपघात कमी होतो. म्हणजेच मातीची धूप कमी होते.
सरी वरंबा आणि बंदिस्त सर्या पद्धत
दिवसेंदिवस अनियमित पडणार्या पावसाचे शेतजमिनीत योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून नंतर सर्यांमध्ये छोटेछोटे बांध टाकणे. अशी ही पद्धत आहे. तूर, कापूस, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. इतर सर्व पद्धतींपेक्षा जास्त प्रकारे पावसाचे पाणी या पद्धतीमुळे मुरविता येते. प्रयोगाच्या आधारे ही पद्धत सर्वांत फायदेशीर आढळून आली आहे.
मृत सरी
शेतात उताराला आडव्या दिशेने दहा मीटर अंतरावर ४५ ते ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल त्रिकोणी आकाराच्या सरी बैलचलित नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी उन्हाळ्यात काढाव्यात. त्या सरीस ०.२ ते ०.४ टक्के उतार दिल्यास अति पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी उपयोगी पडते. दोन सरींमधील क्षेत्रातील पावसाचे पाणी सरीमध्ये साठविले जाते व जमिनीत मुरते. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखण्यात येते. ओळीत पेरण्यात येणार्या आंतरपीक पद्धतीकरिता ही पद्धत उपयोगी आहे.