सामुहिक तलाव
महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ तीनशे सात लाख हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे 65 टक्के म्हणजेच जवळपास दोनशे लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळी, अवर्षणग्रस्त, कोरडवाहू फक्त बेभरवशी पावसावर अवलंबून आहे.
या कोरडवाहू क्षेत्रात दर बत्तीस हेक्टर जमिनीनंतर एक हेक्टर जमिनीवर दोन दशलक्ष घन फूट पाणी
साठवण क्षमतेचा ‘अगस्ती खंदक सामूहिक साठवण तलाव’ याप्रमाणे सहा लाख अगस्ती सामूहिक
तलाव खोदावेत. त्यामुळे सुमारे बाराशे अब्ज घ.फू. (टी.एम.सी.) जलसंपत्ती उपलब्ध होईल. संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के शाश्वत, सर्व कल्याणकारी, स्वावलंबी सिंचन व्यवस्था निर्माण होईल.
गावातच वर्षभर पुरेशा पाण्याची खात्रीची कायमस्वरुपी उपलब्धी झाल्यामुळे शेतकरी दरवर्षी 2 ते 3
पिके सहज घेतील. त्यामुळे कृषि उत्पादनात प्रचंड वाढ होईल. शेतकरी आणि शेती समृद्ध होतील.
शेतीच्या समृद्धीमुळे गावात असंख्य विविध रोजगार निर्माण होतील. गावातील बेकारी नष्ट होईल.
रोजगार निर्मितीमुळे लोकांना कामाचे पैसे मिळतील. लोकांची क्रयशक्ती वाढेल. ते आपोआप दारिद्रय रेषेच्या वर येतील. दारिद्रय निर्मूलन होईल. लोक समृद्धिकडे भराभराटीकडे वाटचाल करतील. गावोगावी शेतकर्यांनी एकत्र येऊन स्वयंसहायता गट स्थापना करावेत. त्या गटांच्या आधारे प्रत्येक बत्तीस हेक्टर जमिनीनंतर एक हेक्टर जमिनीवर एक याप्रमाणे गावात किमान तीस ‘अगस्ती खंदक सामूहिक साठवण तलाव’ खोदावेत. स्वत:ला आणि गावाला जलसमृद्ध, जलस्वावलंबी करावे. हे खंदक एकमेकांना तसेच जवळून वाहणार्या ओढ्यांना आरंभी आणि शेवटी साखळी पद्धतीने जोडावेत. खंदक पावसाच्या व वाहून आलेल्या पाण्याने क्रमाक्रमाने तुडुंब भरतील. तसेच अधिक असलेले पाणी ओढ्यातून पुढे वाहून जाईल. या खंदक तलावातून मत्स्योत्पादन करावे. तसेच नौका-विहार-जलक्रीडा केंद्रे निर्माण करून त्यांचे उत्पन्न घ्यावे.
महाराष्ट्रात धरणाच्या, कालव्याच्या पाण्याच्या लाभापासून वंचित असलेल्या 85 टक्के जिरायती (फक्त पावसावर आधारित अशा) पडिक व नापीक शेतजमिनीत देखील दर बत्तीस हेक्टर क्षेत्रानंतर खालच्या बाजूस एक हेक्टर क्षेत्राचा सहा मीटर खोल असा ‘अगस्ती खंदक सामूहिक साठवण तलाव’ खोदावा. त्यातून सुमारे वीस हजार ब्रास इतकी माती/ मुरुम/ दगड ही गौण खनिजे निघतील. तसेच त्याची पाणी साठवण क्षमता दोन दशलक्ष घन फूट एवढी राहील. या तलावात वरच्या बाजूच्या बत्तीस हेक्टर जमिनीवर पडलेला सुमारे दोनशे मिलीमीटर एवढा पाऊस सतत जमा होत राहिल. तसेच तो तुडुंब भरल्यावर अधिक असलेले पाणी खालच्या तलावात जमा होईल. असे दर चौरस किलोमीटरवर तीन तलाव खोदावेत. याच धर्तीवर प्रत्येक गावात (क्षेत्रफळ सुमारे 10 चौ. कि. मी.) तीस तलाव खोदावेत. त्यामुळे प्रत्येक गावात सुमारे साठ दशलक्ष घन फूट एवढी पाणी साठवण क्षमता / पाणी उपलब्धी निर्माण होईल. ही पाणी उपलब्धी बागायत गावाच्या पाण्याच्या गरजेएवढी आहे. म्हणून प्रत्येक गाव बागायती गाव होईल. कारण वरील गरजेच्या दुपटीपासून दहापटीपर्यंत (400 ते 2000 मि. मी.) पाऊस महाराष्ट्रात वर्षभरात पुढे मागे परंतु निश्चितपणे पडतोच.
हा साठ दशलक्ष घनफूट एवढा पाणी साठा शाश्वत, विपुल, त्वरीत उपलब्ध आणि वर्षभर पुरेल इतका
असेल. त्यामुळे शेतकरी वर्षभरात तीन पिके हमखास घेतील. शिवाय पशुपालन/दुग्धव्यवसायात भरीव वाढ होईल. मत्स्यपालन हा संपूर्ण नवीन व्यवसाय करता येईल. गावात कृषि आधारित कृषिपूरक, कुटीरोद्योग, ग्रामोद्योग, प्रक्रिया उद्योग चालू होतील.
• गावात प्रचंड रोजगार निर्मिती होईल.
• रोजगारांमुळे संपत्ती निर्माण होईल.
• समृद्धी निर्माण होईल.
• गरीबीचे संपूर्ण उच्चाटन होईल.
• संपूर्ण दारिद्र निर्मूलन होईल.
सामुहिक साठवण तलावाचे फायदे ‘अगस्ति खंदक सामूहिक साठवण’ तलावांमुळे अनेक लाभ मिळतील.
• मूलस्थानी पाणी साठवण - शेतातले पाणी शेतात, गावातले पाणी गावात साठविले जाईल.
• शंभर टक्के जलसंधारण व मृदसंधारण होईल.
• वर्षभरात वेळोवेळी पडणार्या पावसामुळे जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत राहील.
• काही प्रमाणात पूर नियंत्रण देखील होईल.
• ऊर्जेची/इंधनाची गरज नाही. कारण प्रवाही पद्धतीने पाणी साठवण होते.
• विलंब नाही, त्वरीत लाभ देणार.
• मोठी भांडवली गुंतवणूक नाही.
• शंभर टक्के सुरक्षित. भेगा पडणे, वाहून जाणे वगैरे धोके अजिबात नाहीत.
• देखभालीची गरज नाही. खर्च नाही. फक्त साचलेला गाळ वरचेवर काढावा लागेल.
• संपूर्ण स्वावलंबी, आत्मनिर्भर.
• वीज वापरात बचत होईल.
• भूगर्भातील पाणी पातळीत प्रचंड वाढ होईल.
• विहिरी, ओढे, नद्या-नाले जीवंत होतील. आठमाही/दहामाही/बारामाही वाहतील.
• लोकांचे स्थलांतर नाही. गावे ओस पडणार नाहीत.
• कोणत्याही साधन सामुग्रीची लोखंड-सिमेंट वगैरेची गरज नाही. तसेच प्लॅन, एस्टिमेट, तंत्रज्ञान
वगैरेची देखील गरज नाही. उलट माती/ मुरुम/दगड या गौण खनिज संपत्तीचे निर्माण होईल.
• पर्यावरण संतुलन साधेल. ग्लोबल वॉर्मिंगला काही प्रमाणात आळा बसेल.
• महाराष्ट्र राज्यात लाखो व गाव पातळीवर शेकडो अकुशल लोकांनआरंभी काही महिने/काही वर्षे केवळ खोदकामाचा शाश्वत रोजगार मिळेल नंतर वर्षभर शाश्वत व पुरेशा जल उपलब्धीनंतर तीन पिके घेण्याचा व त्यानंतर कृषिपूरक, कृषि आधारित तसेच विविध प्रक्रिया उद्योगांचा कायमस्वरुपी रोजगार निर्माण होईल.
• कोणाचेही शोषण होणार नाही. सर्वांचे पोषण करणारी ही संकल्पना आहे.
या कोरडवाहू क्षेत्रात दर बत्तीस हेक्टर जमिनीनंतर एक हेक्टर जमिनीवर दोन दशलक्ष घन फूट पाणी
साठवण क्षमतेचा ‘अगस्ती खंदक सामूहिक साठवण तलाव’ याप्रमाणे सहा लाख अगस्ती सामूहिक
तलाव खोदावेत. त्यामुळे सुमारे बाराशे अब्ज घ.फू. (टी.एम.सी.) जलसंपत्ती उपलब्ध होईल. संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के शाश्वत, सर्व कल्याणकारी, स्वावलंबी सिंचन व्यवस्था निर्माण होईल.
गावातच वर्षभर पुरेशा पाण्याची खात्रीची कायमस्वरुपी उपलब्धी झाल्यामुळे शेतकरी दरवर्षी 2 ते 3
पिके सहज घेतील. त्यामुळे कृषि उत्पादनात प्रचंड वाढ होईल. शेतकरी आणि शेती समृद्ध होतील.
शेतीच्या समृद्धीमुळे गावात असंख्य विविध रोजगार निर्माण होतील. गावातील बेकारी नष्ट होईल.
रोजगार निर्मितीमुळे लोकांना कामाचे पैसे मिळतील. लोकांची क्रयशक्ती वाढेल. ते आपोआप दारिद्रय रेषेच्या वर येतील. दारिद्रय निर्मूलन होईल. लोक समृद्धिकडे भराभराटीकडे वाटचाल करतील. गावोगावी शेतकर्यांनी एकत्र येऊन स्वयंसहायता गट स्थापना करावेत. त्या गटांच्या आधारे प्रत्येक बत्तीस हेक्टर जमिनीनंतर एक हेक्टर जमिनीवर एक याप्रमाणे गावात किमान तीस ‘अगस्ती खंदक सामूहिक साठवण तलाव’ खोदावेत. स्वत:ला आणि गावाला जलसमृद्ध, जलस्वावलंबी करावे. हे खंदक एकमेकांना तसेच जवळून वाहणार्या ओढ्यांना आरंभी आणि शेवटी साखळी पद्धतीने जोडावेत. खंदक पावसाच्या व वाहून आलेल्या पाण्याने क्रमाक्रमाने तुडुंब भरतील. तसेच अधिक असलेले पाणी ओढ्यातून पुढे वाहून जाईल. या खंदक तलावातून मत्स्योत्पादन करावे. तसेच नौका-विहार-जलक्रीडा केंद्रे निर्माण करून त्यांचे उत्पन्न घ्यावे.
महाराष्ट्रात धरणाच्या, कालव्याच्या पाण्याच्या लाभापासून वंचित असलेल्या 85 टक्के जिरायती (फक्त पावसावर आधारित अशा) पडिक व नापीक शेतजमिनीत देखील दर बत्तीस हेक्टर क्षेत्रानंतर खालच्या बाजूस एक हेक्टर क्षेत्राचा सहा मीटर खोल असा ‘अगस्ती खंदक सामूहिक साठवण तलाव’ खोदावा. त्यातून सुमारे वीस हजार ब्रास इतकी माती/ मुरुम/ दगड ही गौण खनिजे निघतील. तसेच त्याची पाणी साठवण क्षमता दोन दशलक्ष घन फूट एवढी राहील. या तलावात वरच्या बाजूच्या बत्तीस हेक्टर जमिनीवर पडलेला सुमारे दोनशे मिलीमीटर एवढा पाऊस सतत जमा होत राहिल. तसेच तो तुडुंब भरल्यावर अधिक असलेले पाणी खालच्या तलावात जमा होईल. असे दर चौरस किलोमीटरवर तीन तलाव खोदावेत. याच धर्तीवर प्रत्येक गावात (क्षेत्रफळ सुमारे 10 चौ. कि. मी.) तीस तलाव खोदावेत. त्यामुळे प्रत्येक गावात सुमारे साठ दशलक्ष घन फूट एवढी पाणी साठवण क्षमता / पाणी उपलब्धी निर्माण होईल. ही पाणी उपलब्धी बागायत गावाच्या पाण्याच्या गरजेएवढी आहे. म्हणून प्रत्येक गाव बागायती गाव होईल. कारण वरील गरजेच्या दुपटीपासून दहापटीपर्यंत (400 ते 2000 मि. मी.) पाऊस महाराष्ट्रात वर्षभरात पुढे मागे परंतु निश्चितपणे पडतोच.
हा साठ दशलक्ष घनफूट एवढा पाणी साठा शाश्वत, विपुल, त्वरीत उपलब्ध आणि वर्षभर पुरेल इतका
असेल. त्यामुळे शेतकरी वर्षभरात तीन पिके हमखास घेतील. शिवाय पशुपालन/दुग्धव्यवसायात भरीव वाढ होईल. मत्स्यपालन हा संपूर्ण नवीन व्यवसाय करता येईल. गावात कृषि आधारित कृषिपूरक, कुटीरोद्योग, ग्रामोद्योग, प्रक्रिया उद्योग चालू होतील.
• गावात प्रचंड रोजगार निर्मिती होईल.
• रोजगारांमुळे संपत्ती निर्माण होईल.
• समृद्धी निर्माण होईल.
• गरीबीचे संपूर्ण उच्चाटन होईल.
• संपूर्ण दारिद्र निर्मूलन होईल.
सामुहिक साठवण तलावाचे फायदे ‘अगस्ति खंदक सामूहिक साठवण’ तलावांमुळे अनेक लाभ मिळतील.
• मूलस्थानी पाणी साठवण - शेतातले पाणी शेतात, गावातले पाणी गावात साठविले जाईल.
• शंभर टक्के जलसंधारण व मृदसंधारण होईल.
• वर्षभरात वेळोवेळी पडणार्या पावसामुळे जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत राहील.
• काही प्रमाणात पूर नियंत्रण देखील होईल.
• ऊर्जेची/इंधनाची गरज नाही. कारण प्रवाही पद्धतीने पाणी साठवण होते.
• विलंब नाही, त्वरीत लाभ देणार.
• मोठी भांडवली गुंतवणूक नाही.
• शंभर टक्के सुरक्षित. भेगा पडणे, वाहून जाणे वगैरे धोके अजिबात नाहीत.
• देखभालीची गरज नाही. खर्च नाही. फक्त साचलेला गाळ वरचेवर काढावा लागेल.
• संपूर्ण स्वावलंबी, आत्मनिर्भर.
• वीज वापरात बचत होईल.
• भूगर्भातील पाणी पातळीत प्रचंड वाढ होईल.
• विहिरी, ओढे, नद्या-नाले जीवंत होतील. आठमाही/दहामाही/बारामाही वाहतील.
• लोकांचे स्थलांतर नाही. गावे ओस पडणार नाहीत.
• कोणत्याही साधन सामुग्रीची लोखंड-सिमेंट वगैरेची गरज नाही. तसेच प्लॅन, एस्टिमेट, तंत्रज्ञान
वगैरेची देखील गरज नाही. उलट माती/ मुरुम/दगड या गौण खनिज संपत्तीचे निर्माण होईल.
• पर्यावरण संतुलन साधेल. ग्लोबल वॉर्मिंगला काही प्रमाणात आळा बसेल.
• महाराष्ट्र राज्यात लाखो व गाव पातळीवर शेकडो अकुशल लोकांनआरंभी काही महिने/काही वर्षे केवळ खोदकामाचा शाश्वत रोजगार मिळेल नंतर वर्षभर शाश्वत व पुरेशा जल उपलब्धीनंतर तीन पिके घेण्याचा व त्यानंतर कृषिपूरक, कृषि आधारित तसेच विविध प्रक्रिया उद्योगांचा कायमस्वरुपी रोजगार निर्माण होईल.
• कोणाचेही शोषण होणार नाही. सर्वांचे पोषण करणारी ही संकल्पना आहे.