मातीनाला बांध
नाला पात्रामध्ये मातीचा बांध घालून पाणीसाठा करणे, पाणी अडविणे, जिरवणे आणि जादा झालेले पाणी सांडीवाटे सुरक्षितपणे काढून देणे अशा प्रकारच्या बांधास माती नालाबांध असे म्हणतात. मातीनाला बांधामुळे पूरनियंत्रण व घळ नियंत्रण अशा प्रकारचे दोन्ही उपाय शक्य आहे.
मातीनाला बांधाचे फायदे
१) अतिवृष्टीमुळे नाल्याला पूर आल्यास पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून जमिनीचे व जमिनी वरील पिकांचे नुकसान होते अशा वेळी नाल्यात बांध घालून पाणी अडवून ठेवल्यास व अतिरिक्त पाणी योग्य आकाराच्या सांडण्यातून नियंत्रित गतीने काढून दिल्यास जमिनीचे होणारे नुकसान थोपविणे शक्य आहे.
२) नाल्यावर बांध घालून अडविलेले पाणी जमिनीत मुरते व त्यामुळे भूजलसाठा वाढण्यास मदत होते. तसेच बांधाच्या प्रभाव क्षेत्रातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते.
३) नाला बांधाच्या ठिकाणी साठलेल्या पाण्याचा उपयोग तात्पुरता अवर्षण काळात करून पावसाअभावी सुकणार्या पिकांना काही प्रमाणात जीवदान देता येते.
४) जनावरांना पिण्यासाठी हंगामी स्वरूपात पाणी उपलब्ध होते.
जागेची निवड
१) ज्या जागी बांध घालावयाचा आहे त्या ठिकाणी पाणलोटाचे क्षेत्र दहा हेक्टरपेक्षा कमी व १००० हेक्टर पेक्षा जास्त असू नये.
२) नाला नळीचा उतार सरासरी तीन टक्केपेक्षा जास्त असू नये. तसेच तळाची रुंदी पाच मीटरपेक्षा कमी व १५ मीटरपेक्षा जास्त असू नये.
३) नालापात्राची खोली एक मीटरपेक्षा जास्त असू नये व नाला बांधाच्या खालच्या बाजूस कमीत कमी सहा हेक्टर लाभक्षेत्र असावे.
४) माती नालाबांध केल्यास सभोवतालची जमीन निवड होणार नाही, याची खात्री करून घ्यावी.
मातीनाला बांधाचे फायदे
१) अतिवृष्टीमुळे नाल्याला पूर आल्यास पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून जमिनीचे व जमिनी वरील पिकांचे नुकसान होते अशा वेळी नाल्यात बांध घालून पाणी अडवून ठेवल्यास व अतिरिक्त पाणी योग्य आकाराच्या सांडण्यातून नियंत्रित गतीने काढून दिल्यास जमिनीचे होणारे नुकसान थोपविणे शक्य आहे.
२) नाल्यावर बांध घालून अडविलेले पाणी जमिनीत मुरते व त्यामुळे भूजलसाठा वाढण्यास मदत होते. तसेच बांधाच्या प्रभाव क्षेत्रातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते.
३) नाला बांधाच्या ठिकाणी साठलेल्या पाण्याचा उपयोग तात्पुरता अवर्षण काळात करून पावसाअभावी सुकणार्या पिकांना काही प्रमाणात जीवदान देता येते.
४) जनावरांना पिण्यासाठी हंगामी स्वरूपात पाणी उपलब्ध होते.
जागेची निवड
१) ज्या जागी बांध घालावयाचा आहे त्या ठिकाणी पाणलोटाचे क्षेत्र दहा हेक्टरपेक्षा कमी व १००० हेक्टर पेक्षा जास्त असू नये.
२) नाला नळीचा उतार सरासरी तीन टक्केपेक्षा जास्त असू नये. तसेच तळाची रुंदी पाच मीटरपेक्षा कमी व १५ मीटरपेक्षा जास्त असू नये.
३) नालापात्राची खोली एक मीटरपेक्षा जास्त असू नये व नाला बांधाच्या खालच्या बाजूस कमीत कमी सहा हेक्टर लाभक्षेत्र असावे.
४) माती नालाबांध केल्यास सभोवतालची जमीन निवड होणार नाही, याची खात्री करून घ्यावी.