समपातळी बांध
पाणलोट क्षेत्रात मधल्या भागात डोंगराच्या पायथ्याजवळ समपातळी बांध तयार केले जातात. जमिनी वरील माती उकरून माती व मुरूम यांचा भराव करून हे बांध तयार केले जातात. बर्याच वेळा हे बांध भुसभुशीत राहतात. जनावरे या भागात परत आल्यास त्यांच्या पायाने हे बांध मोडले जाऊ शकतात आणि पावसाचे पाणी या बांधामधून वाहून छोट्या घळी निर्माण होतात. परिणामी हे दुर्लक्षित राहिल्यास याचा उपयोग न होता, जमिनीची धूप होते. तरी प्रत्येक पावसाळ्यापूर्वी या समपातळी बांध्याची पाहणी करून तुटलेल्या ठिकाणी दुरुस्त केले तर त्याचा उपयोग दीर्घकाळ होईल. समपातळी बांध बांधल्यानंतर तीन ते चार वर्षे ही क्रिया केल्यास या काळात हे बांध मजबूत होऊन स्थिर होईल. हा कमी पावसाच्या प्रदेशात जलसंधारणाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जेथे जमिनीचा उतार सात टक्क्यांपर्यंत आहे, जमीन योग्य निचरा होणारी आहे, अशा ठिकाणी हे बांध फायदेशीर ठरतात.
पाणलोट क्षेत्रात मधल्या भागात डोंगराच्या पायथ्याजवळ समपातळी बांध तयार केले जातात. जमिनी वरील माती उकरून माती व मुरूम यांचा भराव करून हे बांध तयार केले जातात. बर्याच वेळा हे बांध भुसभुशीत राहतात. जनावरे या भागात परत आल्यास त्यांच्या पायाने हे बांध मोडले जाऊ शकतात आणि पावसाचे पाणी या बांधामधून वाहून छोट्या घळी निर्माण होतात. परिणामी हे दुर्लक्षित राहिल्यास याचा उपयोग न होता, जमिनीची धूप होते. तरी प्रत्येक पावसाळ्यापूर्वी या समपातळी बांध्याची पाहणी करून तुटलेल्या ठिकाणी दुरुस्त केले तर त्याचा उपयोग दीर्घकाळ होईल. समपातळी बांध बांधल्यानंतर तीन ते चार वर्षे ही क्रिया केल्यास या काळात हे बांध मजबूत होऊन स्थिर होईल. हा कमी पावसाच्या प्रदेशात जलसंधारणाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जेथे जमिनीचा उतार सात टक्क्यांपर्यंत आहे, जमीन योग्य निचरा होणारी आहे, अशा ठिकाणी हे बांध फायदेशीर ठरतात.