आंतरपीक पद्धती
आंतरपीक पद्धतीत पिकांची निवड करणे फार महत्त्वाचे असते. कारण एक मुख्य पीक धरल्यास दुसरी इतर पिके दुय्यम ठरतात. म्हणून महत्त्वाचे पीक कोणते हे ठरविले पाहिजे. सामान्यतः तृणधान्यांची गरज अधिक असल्याने व त्यातून येणारे उत्पादन इतर पिकांच्या तुलनेत जास्त असल्याने ज्वारी, बाजरी आणि मका ही मुख्य पिके म्हणून घेता येतील. म्हणजे एक मुख्य तृणधान्य असेल, तर दुसरे पीक कडधान्य अथवा तेलबियांचे असावे.
आंतरपीक पद्धतीत कडधान्याचा समावेश केला, तर अनेक लाभ मिळतात. कडधान्यामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते, तसेच या पिकांचा पाला फार मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडल्याने सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून तिची उत्पादकता वाढते; तसेच कडधान्य पिकांची मुळे खोलवर जात असल्याने खोलीवरून ओलावा आणि अन्नद्रव्ये मिळविली जातात. तृणधान्य आणि कडधान्य अशी आंतरपीक पद्धतीदेखील करता येईल. आंतरपीक पद्धतीमुळे तणांचा बंदोबस्तदेखील होतो, असे दिसून येते. कारण जमीन जास्त प्रमाणात आच्छादून राहते आणि त्यामुळे तणास सूर्यप्रकाश मिळत नाही, परिणामी त्याची वाढ खुंटते. म्हणूनच पिके निवडताना या सर्व बाबींचा विचार करावा. सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने सांगितलेली बाजरी अधिक तूर ही पीक पद्धती अतिशय उपयुक्त आहे. याचबरोबर हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने निवडलेल्या ज्वारी अधिक तूर किंवा मका अधिक तूर या पद्धतीपण उपयुक्त आहेत. सूर्यफूल अधिक तूर आंतरपीक पद्धतही चांगली आहे.
आंतरपिकांचे फायदे
1) उत्पादनात वाढ होते, पीक येण्याची घनता वाढते.
2) कडधान्य अगर तेलबिया पिकाचे उत्पादन वाढविता येते.
3) उत्पादनातील स्थिरता या पद्धतीने येऊ शकते. प्रतिकूल हंगामात ही पद्धत यशस्वी होते.
4) खतांचा सुयोग्य व पुरेपूर वापर होतो. दोन पिके जरी असली, तरीपण एका पिकासाठीच खत देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत पुरेपूर वापरले जाते.
5) तूर व मूग याप्रमाणे दुय्यम पीक असल्याने काही प्रमाणात जमिनीची सुपीकता टिकविण्यात येते.
6) दोन पिकांच्या मुळांची वाढ भिन्न पद्धतीने होत असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. जमिनीत 120 दिवसांपेक्षा जास्त दिवस ओलावा टिकून राहत असेल, तर आंतरपीक फायदेशीर ठरते. 150 दिवसांपर्यंत ओलावा असलेल्या जमिनीमध्येही कापूस, तूर यांसारख्या पिकांबरोबर आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते.
आंतरपीक पद्धतीत पिकांची निवड करणे फार महत्त्वाचे असते. कारण एक मुख्य पीक धरल्यास दुसरी इतर पिके दुय्यम ठरतात. म्हणून महत्त्वाचे पीक कोणते हे ठरविले पाहिजे. सामान्यतः तृणधान्यांची गरज अधिक असल्याने व त्यातून येणारे उत्पादन इतर पिकांच्या तुलनेत जास्त असल्याने ज्वारी, बाजरी आणि मका ही मुख्य पिके म्हणून घेता येतील. म्हणजे एक मुख्य तृणधान्य असेल, तर दुसरे पीक कडधान्य अथवा तेलबियांचे असावे.
आंतरपीक पद्धतीत कडधान्याचा समावेश केला, तर अनेक लाभ मिळतात. कडधान्यामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते, तसेच या पिकांचा पाला फार मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडल्याने सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून तिची उत्पादकता वाढते; तसेच कडधान्य पिकांची मुळे खोलवर जात असल्याने खोलीवरून ओलावा आणि अन्नद्रव्ये मिळविली जातात. तृणधान्य आणि कडधान्य अशी आंतरपीक पद्धतीदेखील करता येईल. आंतरपीक पद्धतीमुळे तणांचा बंदोबस्तदेखील होतो, असे दिसून येते. कारण जमीन जास्त प्रमाणात आच्छादून राहते आणि त्यामुळे तणास सूर्यप्रकाश मिळत नाही, परिणामी त्याची वाढ खुंटते. म्हणूनच पिके निवडताना या सर्व बाबींचा विचार करावा. सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने सांगितलेली बाजरी अधिक तूर ही पीक पद्धती अतिशय उपयुक्त आहे. याचबरोबर हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने निवडलेल्या ज्वारी अधिक तूर किंवा मका अधिक तूर या पद्धतीपण उपयुक्त आहेत. सूर्यफूल अधिक तूर आंतरपीक पद्धतही चांगली आहे.
आंतरपिकांचे फायदे
1) उत्पादनात वाढ होते, पीक येण्याची घनता वाढते.
2) कडधान्य अगर तेलबिया पिकाचे उत्पादन वाढविता येते.
3) उत्पादनातील स्थिरता या पद्धतीने येऊ शकते. प्रतिकूल हंगामात ही पद्धत यशस्वी होते.
4) खतांचा सुयोग्य व पुरेपूर वापर होतो. दोन पिके जरी असली, तरीपण एका पिकासाठीच खत देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत पुरेपूर वापरले जाते.
5) तूर व मूग याप्रमाणे दुय्यम पीक असल्याने काही प्रमाणात जमिनीची सुपीकता टिकविण्यात येते.
6) दोन पिकांच्या मुळांची वाढ भिन्न पद्धतीने होत असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. जमिनीत 120 दिवसांपेक्षा जास्त दिवस ओलावा टिकून राहत असेल, तर आंतरपीक फायदेशीर ठरते. 150 दिवसांपर्यंत ओलावा असलेल्या जमिनीमध्येही कापूस, तूर यांसारख्या पिकांबरोबर आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते.