समपातळी चर
पाणलोट क्षेत्रातील डोंगराच्या उताराहून खालील भागात वेगात वाहत येणारे पाणी समपातळी चरात अडविले जाते. त्यामुळे पाण्याचा वेग कमी होतो. तसेच पाण्याबरोबर वाहत आलेली माती चरामध्ये साठून राहिल्यामुळे झाडांची वाढ जोमाने होते. तसेच बरेच निष्कर्ष आहेत. तथापि, बर्याच ठिकाणी समपातळी चर मातीने पूर्णतः भरून गेलेले आहेत. एकदा तयार केलेले समपातळी चर कालांतराने पूर्णतः भरून जातातच. त्यामुळे डोंगरमाथ्याहून खालच्या दिशेने वाहत येणार्या पाण्याला कालांतराने कुठलाही अटकाव राहणार नाही व पूर्वी ज्याप्रमाणे पाणी वाहत होते, त्याप्रमाणेच वाहील. त्यामुळे समपातळी चरामध्ये साठलेली मातीही दर तीन वर्षांनी काढून टाकून चर पुन्हा पूर्वीप्रमाणे होतील. याप्रमाणे काळजी करावी तरच समपातळी चरांचा उद्देश सफल होईल व जमिनीची धूप थांबविण्याचे कार्य दिवसेंदिवस सुरू राहील.
शासकीय जमिनीवर या चर्या असतील, तर शासनाने पाणलोट क्षेत्र कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर देखील याकडे लक्ष द्यावे आणि जर या चर्या शेतकर्यांच्या शेतावर असतील तर स्वत: शेतकर्याने उन्हाळा किंवा रिकाम्या वेळात हे माती काढण्याचे काम करावे. असे केल्यास शेतकर्यांची डोंगरमाथ्याची जमीन सुधारून तेथे वनीकरण विकास चांगल्या तर्हेने होऊ शकतो. माती काढण्याच्या कामासाठी फार मोठ्या आर्थिक तरतुदींची गरज नाही.
समपातळीत रेषेवर ३० सें. मी. खोल व ६० सें. मी. रुंद असे सलग चर खोदावेत. या चरातून निघणारी माती चराच्या खालच्या बाजूस लावावी, त्यामुळे दोन चरांमधील पट्ट्यामध्ये ओलावा दीर्घकाळ राहतो. या ओलाव्याचा फायदा गवताची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. शिवाय जमिनीवरून वाहून जाणार्या पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबविला जातो. पडीक जमिनीवर गवताचे चांगले आच्छादन निर्माण होण्यास मदत होते.
पाणलोट क्षेत्रातील डोंगराच्या उताराहून खालील भागात वेगात वाहत येणारे पाणी समपातळी चरात अडविले जाते. त्यामुळे पाण्याचा वेग कमी होतो. तसेच पाण्याबरोबर वाहत आलेली माती चरामध्ये साठून राहिल्यामुळे झाडांची वाढ जोमाने होते. तसेच बरेच निष्कर्ष आहेत. तथापि, बर्याच ठिकाणी समपातळी चर मातीने पूर्णतः भरून गेलेले आहेत. एकदा तयार केलेले समपातळी चर कालांतराने पूर्णतः भरून जातातच. त्यामुळे डोंगरमाथ्याहून खालच्या दिशेने वाहत येणार्या पाण्याला कालांतराने कुठलाही अटकाव राहणार नाही व पूर्वी ज्याप्रमाणे पाणी वाहत होते, त्याप्रमाणेच वाहील. त्यामुळे समपातळी चरामध्ये साठलेली मातीही दर तीन वर्षांनी काढून टाकून चर पुन्हा पूर्वीप्रमाणे होतील. याप्रमाणे काळजी करावी तरच समपातळी चरांचा उद्देश सफल होईल व जमिनीची धूप थांबविण्याचे कार्य दिवसेंदिवस सुरू राहील.
शासकीय जमिनीवर या चर्या असतील, तर शासनाने पाणलोट क्षेत्र कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर देखील याकडे लक्ष द्यावे आणि जर या चर्या शेतकर्यांच्या शेतावर असतील तर स्वत: शेतकर्याने उन्हाळा किंवा रिकाम्या वेळात हे माती काढण्याचे काम करावे. असे केल्यास शेतकर्यांची डोंगरमाथ्याची जमीन सुधारून तेथे वनीकरण विकास चांगल्या तर्हेने होऊ शकतो. माती काढण्याच्या कामासाठी फार मोठ्या आर्थिक तरतुदींची गरज नाही.
समपातळीत रेषेवर ३० सें. मी. खोल व ६० सें. मी. रुंद असे सलग चर खोदावेत. या चरातून निघणारी माती चराच्या खालच्या बाजूस लावावी, त्यामुळे दोन चरांमधील पट्ट्यामध्ये ओलावा दीर्घकाळ राहतो. या ओलाव्याचा फायदा गवताची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. शिवाय जमिनीवरून वाहून जाणार्या पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबविला जातो. पडीक जमिनीवर गवताचे चांगले आच्छादन निर्माण होण्यास मदत होते.