महाराष्ट्र राज्यातील एकूण 307 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 200 लाख हेक्टर क्षेत्र कोरडवाहू असून त्यातील 182 लाख हेक्टर क्षेत्र निव्वळ पिकाखाली आहे. त्यापैकी फक्त 16 टक्के क्षेत्र ओलीताखाली आहे. सिंचन आयोगाच्या शिफाराशीनुसार हे बागायतीचे प्रमाण जास्तीत जास्त 30 टक्क्यांपर्यंत वाढविता येईल. याचाच अर्थ असा की, उर्वरीत 70 टक्के क्षेत्र कोरडवाहूच राहणार आहे. 1942 साली जो जमीन सुधारणा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी प्रामुख्याने जमिनीची होणारी धूप थांबविणे हा प्रमुख हेतू होता. मृद व जलसंधारणाची विविध कामे गेल्या 4 दशकाहून अधिक वर्षांच्या कालावधीत राज्यात करण्यात येत आहेत. अगोदर ही कामे विखुरलेल्या स्वरुपात, सर्वसाधारणपणे कामाची मागणी विचारात घेऊन केली जात होती. परंतु महाराष्ट्रात वारंवार येणार्या अवर्षणाची परिस्थिती आणि दुष्काळाचे चक्र चालूच असल्यामुळे जमिनीची धूप थांबविणे बरोबरच भूगर्भात जास्तीत जास्त पाणी मुरविणे याही बाबीलाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले. 1982-83 मध्ये मृद आणि जल संधारणाची विविध कामे पाणलोट पाडून त्यातील संपूर्ण क्षेत्रावर जमिनीच्या उपयोगीतेनुसार घेण्यात यावी ही संकल्पना पुढे आली.
महाराष्ट्र शासनाने या संकल्पनेला अनुरूप असा सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश जमिनीची धूप थांबविणे, पाणी मूलस्थानी जिरविणे, भूगर्भातील पाणी साठा वाढविणे, भूगर्भातील पाणीसाठा पिकांसाठी वापरणे हे आहेत. स्वाभाविकच आपल्या मनात पाणलोट क्षेत्र विकास काय आहे हा प्रश्न निर्माण झाला असणार, तेव्हा पाणलोट क्षेत्र हे एक असे विशिष्ट क्षेत्र आहे. की ज्याच्या तिन्ही बाजूस चढ असून पावसाचे पडणारे पाणी लहान मोठ्या ओघळींद्वारे मुख्य नाल्यास अथवा नदीस ज्या एके ठिकाणी येवून मिळतात त्या ठिकाणापासून तर चढापर्यंत असलेल्या संपूर्ण क्षेत्रास पाणलोट म्हणतात.
महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने राज्यात असे 1481 पाणलोट पाडलेले आहेत.
शासन स्तरावर स्वतंत्र जलसंधारण विभाग निर्माण करून त्यामध्ये मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा ही खाती जलसंधारण या विभागाच्या अधिपत्याखाली आणली गेली. यात गाव हा विकासाचा घटक धरून पाणलोटावर आधारित मृद संधारण व जलसंधारणाची कामे करणे अभिप्रेत आहे. या सर्वांमध्ये एक महत्त्वाची बाब आता विचारात घेतली आहे, ती म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासासाठी निवडले की, त्या पाणलोट क्षेत्रावर जो पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करता येते. पावसाचे पडणारे पाणी त्यातून किती पाणी उपलब्ध होणार आहे? त्यातील किती पाणी विविध जल संधारणाचे माध्यमातून अडविता येईल आणि किती पाणी शिल्लक राहील? या सर्व बाबी विचारात घेण्यात येतात. पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, जमिनीचा वापर व पाणी साठविण्यासाठी भूगर्भातील क्षमता इत्यादी बाबींचा विचार करून कामाचे नियोजन करता येते.
कशामुळे होते धूप?
पाणी व वारा या मुख्य दोन घटकांमुळे जमिनीची बहुतांश धूप घडून येते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणार्या अपधावेमुळे जमिनीची धूप होते. या धुपेच्या सालकाठी धूप, ओघळपाडी धूप व घळपाडी धूप या तीन अवस्था आहेत. घळपाडी धूप ही जमिनीच्या धुपेची शेवटची आणि विध्वंसक अवस्था आहे. या अवस्थेत जमीन लागवडीखाली आणता येत नाही. जमिनीच्या धुपेमुळे वाहून गेलेली माती पुढे मोठमोठ्या जलाशयात साठली जाते. त्यामुळे जलाशयांची पाणी साठवणक्षमता दिवसेंदिवस घटते.
होणारा परिणाम
जमिनीच्या धुपेवर पाऊस, वारा, तापमान, भूरचना, वनस्पती आणि जमिनीचा प्रकार या घटकांचा परिणाम होतो. पडणार्या पावसाचे प्रमाण आणि तीव्रता जास्त असेल तर जमिनीच्या होणार्या धुपेचे प्रमाण जास्त असते.
जमिनीचा उतार जास्त असल्यास वाहणार्या पाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप घडून येते.
काय करायला हवे?
जमिनीवर वनस्पतींचे, गवताचे आच्छादन केले पाहिजे. त्यामुळे होणार्या धुपेचे प्रमाण कमी होईल. जमिनीवरील वनस्पतींच्या आच्छादनामुळे जमिनीची धुपोत्पादक शक्ती कमी होते. मुळांमुळे मातीचे कण एकमेकांस घट्ट चिकटून राहतात. त्यामुळे जमिनीची धूप प्रतिकारशक्ती वाढते.
शेतीची उत्पादकता वाढावी म्हणून जमिनीची धूप थांबविण्याबरोबरच शेतातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडविण्यावर भर देण्यात येत आहे. सन 1982 पासून मृद् आणि जलसंधारणाची विविध कामे पाणलोट क्षेत्रात गरजेनुसार घेण्याचा विचार पुढे येऊन सर्वंकष पाणलोट क्षेत्र हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मृद् व जलसंधारणाची कामे, कुरण विकास, वृक्ष लागवड आदी कामे हाती घेण्यात येत आहेत. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यामागे पाणलोट क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, त्या क्षेत्रात वाहणार्या मानवी समूहाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावणे, नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन करणे, गावपातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या बाबी अंतर्भूत आहेत. पूर्वीच्या काळी मृद्संधारणासाठी एखादा उपचार शेतकरी अवलंबित असत; परंतु पाणलोट क्षेत्रनिहाय विविध मृद् व जलसंधारण उपाय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात, हे राज्यात राबविण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांनी दाखवून दिले आहे. त्यासोबतच राज्यातील ज्या भागात पाणलोट क्षेत्राची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागात दुष्काळाची तीव्रताही कमी जाणवते.
करावयाचे उपाय
जमिनीची धुपेला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी शास्त्रीय उपचारांबरोबरच अभियांत्रिकी उपायही उपयोगाचे आहेत. कृषी शास्त्रीय उपचारांत समपातळी मशागत, समपातळी पेरणी, पिकांची फेरपालट, पट्टापेर पद्धत, जमिनीवर आच्छादनांचा वापर, जैविक बांध बंदिस्ती, या उपचारांचा समावेश होतो.
अभियांत्रिकी उपचारांत समपातळी बांध, ढाळीचे बांध, घळी नियंत्रण उपचार, गॅबियन बंधारे, सलग समतल चर, एका आड एक चर मजगीकरण, सपाट ओटे आदींचा अवलंब करून जमिनीच्या धुपेस अटकाव निर्माण करता येतो. तसेच वृक्ष लागवड, वनशेती, कुरण विकास, खस गवताची लागवड याद्वारेही जमिनीची धूप रोखता येते. पाणलोट क्षेत्रावर आधारित केलेल्या मृद् व जलसंधारणाच्या कामांनीच जमिनीच्या धुपेची समस्या आणि त्यातून पुढे उद्भवणार्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते.
पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर विशेष भर देण्यात आलेला आहे.
अ) लागवडी लायक जमिनीवरील उपचार
1) समपातळीवरील जैविक बांध : यामध्ये खस, सुबाभूळ अथवा स्थानिक गवताचे बांध घालणे.
2) भातखाचरे : भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी भातखाचरे करणे.
3) मजगीकरण : कोकण व पश्चिम घाट विभागासाठी मजगीकरण.
ब) लागवडीस अयोग्य जमिनीवरील उपचार
1) अत्यंत हलक्या अशा जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. अशा जमिनीवर त्या भागात येणार्या गवतांचे बी फेकणे.
2) वृक्ष लागवड व कुरण विकास.
3) समपातळीवर जैविक बांध आणि
4) जैविक पट्टे तयार करणे.
क) ओघळीचे नियंत्रक
1) लाईव्ह चेक डॅम
2) ब्रशवूड डॅम
3) लूज बोल्डर स्ट्रक्चर्स
4) गॅबीयन बांधकामे
5) मातीचे व सिमेंटचे नालाबंध
6) डायव्हर्शन बंधारे
7) भूमीगत बंधारे आणि
8) जेथे कठीण खडकामुळे भूगर्भात पाणी साठा होऊ शकत नाही त्या ठिकाणी हायड्रो फ्रॅक्चरींग.
महाराष्ट्र शासनाने या संकल्पनेला अनुरूप असा सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश जमिनीची धूप थांबविणे, पाणी मूलस्थानी जिरविणे, भूगर्भातील पाणी साठा वाढविणे, भूगर्भातील पाणीसाठा पिकांसाठी वापरणे हे आहेत. स्वाभाविकच आपल्या मनात पाणलोट क्षेत्र विकास काय आहे हा प्रश्न निर्माण झाला असणार, तेव्हा पाणलोट क्षेत्र हे एक असे विशिष्ट क्षेत्र आहे. की ज्याच्या तिन्ही बाजूस चढ असून पावसाचे पडणारे पाणी लहान मोठ्या ओघळींद्वारे मुख्य नाल्यास अथवा नदीस ज्या एके ठिकाणी येवून मिळतात त्या ठिकाणापासून तर चढापर्यंत असलेल्या संपूर्ण क्षेत्रास पाणलोट म्हणतात.
महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने राज्यात असे 1481 पाणलोट पाडलेले आहेत.
शासन स्तरावर स्वतंत्र जलसंधारण विभाग निर्माण करून त्यामध्ये मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा ही खाती जलसंधारण या विभागाच्या अधिपत्याखाली आणली गेली. यात गाव हा विकासाचा घटक धरून पाणलोटावर आधारित मृद संधारण व जलसंधारणाची कामे करणे अभिप्रेत आहे. या सर्वांमध्ये एक महत्त्वाची बाब आता विचारात घेतली आहे, ती म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासासाठी निवडले की, त्या पाणलोट क्षेत्रावर जो पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करता येते. पावसाचे पडणारे पाणी त्यातून किती पाणी उपलब्ध होणार आहे? त्यातील किती पाणी विविध जल संधारणाचे माध्यमातून अडविता येईल आणि किती पाणी शिल्लक राहील? या सर्व बाबी विचारात घेण्यात येतात. पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, जमिनीचा वापर व पाणी साठविण्यासाठी भूगर्भातील क्षमता इत्यादी बाबींचा विचार करून कामाचे नियोजन करता येते.
कशामुळे होते धूप?
पाणी व वारा या मुख्य दोन घटकांमुळे जमिनीची बहुतांश धूप घडून येते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणार्या अपधावेमुळे जमिनीची धूप होते. या धुपेच्या सालकाठी धूप, ओघळपाडी धूप व घळपाडी धूप या तीन अवस्था आहेत. घळपाडी धूप ही जमिनीच्या धुपेची शेवटची आणि विध्वंसक अवस्था आहे. या अवस्थेत जमीन लागवडीखाली आणता येत नाही. जमिनीच्या धुपेमुळे वाहून गेलेली माती पुढे मोठमोठ्या जलाशयात साठली जाते. त्यामुळे जलाशयांची पाणी साठवणक्षमता दिवसेंदिवस घटते.
होणारा परिणाम
जमिनीच्या धुपेवर पाऊस, वारा, तापमान, भूरचना, वनस्पती आणि जमिनीचा प्रकार या घटकांचा परिणाम होतो. पडणार्या पावसाचे प्रमाण आणि तीव्रता जास्त असेल तर जमिनीच्या होणार्या धुपेचे प्रमाण जास्त असते.
जमिनीचा उतार जास्त असल्यास वाहणार्या पाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप घडून येते.
काय करायला हवे?
जमिनीवर वनस्पतींचे, गवताचे आच्छादन केले पाहिजे. त्यामुळे होणार्या धुपेचे प्रमाण कमी होईल. जमिनीवरील वनस्पतींच्या आच्छादनामुळे जमिनीची धुपोत्पादक शक्ती कमी होते. मुळांमुळे मातीचे कण एकमेकांस घट्ट चिकटून राहतात. त्यामुळे जमिनीची धूप प्रतिकारशक्ती वाढते.
शेतीची उत्पादकता वाढावी म्हणून जमिनीची धूप थांबविण्याबरोबरच शेतातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडविण्यावर भर देण्यात येत आहे. सन 1982 पासून मृद् आणि जलसंधारणाची विविध कामे पाणलोट क्षेत्रात गरजेनुसार घेण्याचा विचार पुढे येऊन सर्वंकष पाणलोट क्षेत्र हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मृद् व जलसंधारणाची कामे, कुरण विकास, वृक्ष लागवड आदी कामे हाती घेण्यात येत आहेत. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यामागे पाणलोट क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, त्या क्षेत्रात वाहणार्या मानवी समूहाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावणे, नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन करणे, गावपातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या बाबी अंतर्भूत आहेत. पूर्वीच्या काळी मृद्संधारणासाठी एखादा उपचार शेतकरी अवलंबित असत; परंतु पाणलोट क्षेत्रनिहाय विविध मृद् व जलसंधारण उपाय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात, हे राज्यात राबविण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांनी दाखवून दिले आहे. त्यासोबतच राज्यातील ज्या भागात पाणलोट क्षेत्राची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागात दुष्काळाची तीव्रताही कमी जाणवते.
करावयाचे उपाय
जमिनीची धुपेला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी शास्त्रीय उपचारांबरोबरच अभियांत्रिकी उपायही उपयोगाचे आहेत. कृषी शास्त्रीय उपचारांत समपातळी मशागत, समपातळी पेरणी, पिकांची फेरपालट, पट्टापेर पद्धत, जमिनीवर आच्छादनांचा वापर, जैविक बांध बंदिस्ती, या उपचारांचा समावेश होतो.
अभियांत्रिकी उपचारांत समपातळी बांध, ढाळीचे बांध, घळी नियंत्रण उपचार, गॅबियन बंधारे, सलग समतल चर, एका आड एक चर मजगीकरण, सपाट ओटे आदींचा अवलंब करून जमिनीच्या धुपेस अटकाव निर्माण करता येतो. तसेच वृक्ष लागवड, वनशेती, कुरण विकास, खस गवताची लागवड याद्वारेही जमिनीची धूप रोखता येते. पाणलोट क्षेत्रावर आधारित केलेल्या मृद् व जलसंधारणाच्या कामांनीच जमिनीच्या धुपेची समस्या आणि त्यातून पुढे उद्भवणार्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते.
पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर विशेष भर देण्यात आलेला आहे.
अ) लागवडी लायक जमिनीवरील उपचार
1) समपातळीवरील जैविक बांध : यामध्ये खस, सुबाभूळ अथवा स्थानिक गवताचे बांध घालणे.
2) भातखाचरे : भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी भातखाचरे करणे.
3) मजगीकरण : कोकण व पश्चिम घाट विभागासाठी मजगीकरण.
ब) लागवडीस अयोग्य जमिनीवरील उपचार
1) अत्यंत हलक्या अशा जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. अशा जमिनीवर त्या भागात येणार्या गवतांचे बी फेकणे.
2) वृक्ष लागवड व कुरण विकास.
3) समपातळीवर जैविक बांध आणि
4) जैविक पट्टे तयार करणे.
क) ओघळीचे नियंत्रक
1) लाईव्ह चेक डॅम
2) ब्रशवूड डॅम
3) लूज बोल्डर स्ट्रक्चर्स
4) गॅबीयन बांधकामे
5) मातीचे व सिमेंटचे नालाबंध
6) डायव्हर्शन बंधारे
7) भूमीगत बंधारे आणि
8) जेथे कठीण खडकामुळे भूगर्भात पाणी साठा होऊ शकत नाही त्या ठिकाणी हायड्रो फ्रॅक्चरींग.