अस्तरीत वनराई बंधारा
कोकणात कृषि विद्यापीठाच्या पुढाकाराने प्रारंभ झालेल्या कौतुकास्पद अशा वनराई बंधार्यांच्या चळवळीमधून काही महत्त्वाच्या अडचणी लक्षात आल्या. या अडचणी काही प्रमाणात सोडवून आपण वनराई बंधारा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जर वनराई बंधारे मोठ्या संख्येने बांधले गेले तर त्यासाठी गाभा भिंत बांधायला लागणारी चांगली माती उपसण्याचे प्रमाण वाढेल. ही सुपीक माती दरवर्षी वाहून जाऊन होणारे नुकसान कमी करणे आणि पाणी आणखी योग्य पद्धतीने अडविणे या उद्देशाने आपण वनराई बंधार्यामध्ये काही सुधारणा सुचविल्या आहेत. यासाठी जागेची निवड करताना वरील प्रमाणेच निकष लावावेत. अर्थात ही मोहिम पावसाळा संपताना सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून अंमलात आणल्यास रबी हंगामातील सिंचनासाठी तसेच परिसरातील विहिरींना फायदा होतो.
बांधकामासाठी लागणारे साहित्य
1. रासायनिक खतांच्या किंवा सिमेंटच्या रिकाम्या गोण्या
2. गोण्या शिवण्यासाठी प्लॅस्टिक दोरी
3. दाभण
4. माती किंवा वाळू
5. बंधार्याच्या वरच्या बाजूस टाकण्यासाठी प्लॅस्टिक कापड
अस्तरीत वनराई बंधार्यांचे फायदे
प्रचलित वनराई बंधार्यांत वर नमूद केल्याप्रमाणे सर्व फायदे आपल्याला यामध्ये मिळतातच. त्याशिवाय आणखीही काही महत्त्वाचे फायदे
1. गाभा भिंतीसाठी माती लागत नाही
2. सुपीक मातीची दरवर्षी होणारी धूप मोठ्या प्रमाणात कमी होते.
3. जमिनीची सुपीकता टिकून राहते.
4. प्लॅस्टिक अस्तरणामुळे नाल्यातून पाझरणारे पाणी कमी होते आणि पाणी जास्त वेळ टिकते.
5. लोक सहभागातून जलसंधारण साधता येते.
6. कमी खर्चामध्ये जास्त वेळ पाणी अडविता येते.
7. अडविलेले पाणी पूरक सिंचनासाठी तसेच जनावरासाठी वापरता येते.
8. विहीर पुनर्भरणासाठी मदत होते.
9. बंधारा बांधण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता नाही.
10. अशा प्रकारच्या बंधार्यामुळे उन्हाळ्यात जाणवणार्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सोडविता येईल.
सुधारित वनराई बंधारा बांधकामाची पद्धत
1. यापूर्वी नमुद केल्याप्रमाणे प्रचलित वनराई बंधार्याच्या पद्धतीने या सुधारित बंधार्याच्या उपचाराची तयारी करावी.
2. प्लॅस्टिक कापड टाकल्यामुळे दोन पोत्यांच्यामध्ये माती टाकण्याची आवश्यकता नाही. तसेच बांधामधून पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी होईल. फक्त येथे गाभा भिंतीऐवजी दगड-मातीने भरलेली सिमेंट गोण्यांचे थर द्यावेत. या थराची उभारणीसुद्धा सांधेमोड पद्धतीने करावी.
3. वनराई बंधार्याच्या वरील बाजूस प्लॅस्टिकचे अस्तरण द्यावे. हे प्लॅस्टिक कापड तळामध्ये आणि काठांवर मातीत घट्ट पुरावे की जेणेकरून पाण्याच्या प्रवाहामुळे ते निघणार नाही.
4. वनराई बंधार्याच्या एका बाजूने अतिरिक्त पाणी जाण्यासाठी वाट करून द्यावी. अशा पद्धतीने पाणी अडविल्यास पाणी साठा जास्त दिवस टिकतो आणि यात सुपीक मातीचा वापरही टाळता येतो. पाण्याचा पाझर अतिशय कमी होतो.
वर नमूद केलेले आणि चर्चिलेले सर्व उपाय हे गाव पातळीवर लोकसहभागातून अवलंबिणे शक्य आहेत. यासाठी लागणारे तांत्रिक सहाय्य डॉ. बा.सा.कोकण कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ पुरवू शकतात. पण या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वार्थाने गरज आहे ती लोक जागरणाची आणि लोकसहभागाची. सुयोग्य जागी, सुयोग्य पद्धतीने हे उपचार घेतल्यास याचे दृष्य परिणाम सभोवतालच्या जनतेला त्याच वर्षी अनुभवता येतील. या पद्धतीने अडविलेले, जिरविलेले आणि साठविलेले पाणी हे लाख मोलाचे असते. या पाण्याचा काटकसरीने वापर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यादृष्टीने शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर आणि पिकांची फेरपालट शास्त्रीयदृष्ट्या अपरिहार्य ठरते.
यातूनच कोकणातील शेतकर्यांचे उत्पन्न वाढून रहाणीमान उंचावू शकते. या छोट्या छोट्या उपचारांची सुरुवात करून पाणलोट क्षेत्रावर आधारीत आपल्या कोकणाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास प्रक्रियेत अग्रभागी राहणे हेच आपणा सर्वांचे अंतिम ध्येय आहे.
बांधकामासाठी लागणारे साहित्य
1. रासायनिक खतांच्या किंवा सिमेंटच्या रिकाम्या गोण्या
2. गोण्या शिवण्यासाठी प्लॅस्टिक दोरी
3. दाभण
4. माती किंवा वाळू
5. बंधार्याच्या वरच्या बाजूस टाकण्यासाठी प्लॅस्टिक कापड
अस्तरीत वनराई बंधार्यांचे फायदे
प्रचलित वनराई बंधार्यांत वर नमूद केल्याप्रमाणे सर्व फायदे आपल्याला यामध्ये मिळतातच. त्याशिवाय आणखीही काही महत्त्वाचे फायदे
1. गाभा भिंतीसाठी माती लागत नाही
2. सुपीक मातीची दरवर्षी होणारी धूप मोठ्या प्रमाणात कमी होते.
3. जमिनीची सुपीकता टिकून राहते.
4. प्लॅस्टिक अस्तरणामुळे नाल्यातून पाझरणारे पाणी कमी होते आणि पाणी जास्त वेळ टिकते.
5. लोक सहभागातून जलसंधारण साधता येते.
6. कमी खर्चामध्ये जास्त वेळ पाणी अडविता येते.
7. अडविलेले पाणी पूरक सिंचनासाठी तसेच जनावरासाठी वापरता येते.
8. विहीर पुनर्भरणासाठी मदत होते.
9. बंधारा बांधण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता नाही.
10. अशा प्रकारच्या बंधार्यामुळे उन्हाळ्यात जाणवणार्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सोडविता येईल.
सुधारित वनराई बंधारा बांधकामाची पद्धत
1. यापूर्वी नमुद केल्याप्रमाणे प्रचलित वनराई बंधार्याच्या पद्धतीने या सुधारित बंधार्याच्या उपचाराची तयारी करावी.
2. प्लॅस्टिक कापड टाकल्यामुळे दोन पोत्यांच्यामध्ये माती टाकण्याची आवश्यकता नाही. तसेच बांधामधून पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी होईल. फक्त येथे गाभा भिंतीऐवजी दगड-मातीने भरलेली सिमेंट गोण्यांचे थर द्यावेत. या थराची उभारणीसुद्धा सांधेमोड पद्धतीने करावी.
3. वनराई बंधार्याच्या वरील बाजूस प्लॅस्टिकचे अस्तरण द्यावे. हे प्लॅस्टिक कापड तळामध्ये आणि काठांवर मातीत घट्ट पुरावे की जेणेकरून पाण्याच्या प्रवाहामुळे ते निघणार नाही.
4. वनराई बंधार्याच्या एका बाजूने अतिरिक्त पाणी जाण्यासाठी वाट करून द्यावी. अशा पद्धतीने पाणी अडविल्यास पाणी साठा जास्त दिवस टिकतो आणि यात सुपीक मातीचा वापरही टाळता येतो. पाण्याचा पाझर अतिशय कमी होतो.
वर नमूद केलेले आणि चर्चिलेले सर्व उपाय हे गाव पातळीवर लोकसहभागातून अवलंबिणे शक्य आहेत. यासाठी लागणारे तांत्रिक सहाय्य डॉ. बा.सा.कोकण कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ पुरवू शकतात. पण या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वार्थाने गरज आहे ती लोक जागरणाची आणि लोकसहभागाची. सुयोग्य जागी, सुयोग्य पद्धतीने हे उपचार घेतल्यास याचे दृष्य परिणाम सभोवतालच्या जनतेला त्याच वर्षी अनुभवता येतील. या पद्धतीने अडविलेले, जिरविलेले आणि साठविलेले पाणी हे लाख मोलाचे असते. या पाण्याचा काटकसरीने वापर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यादृष्टीने शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर आणि पिकांची फेरपालट शास्त्रीयदृष्ट्या अपरिहार्य ठरते.
यातूनच कोकणातील शेतकर्यांचे उत्पन्न वाढून रहाणीमान उंचावू शकते. या छोट्या छोट्या उपचारांची सुरुवात करून पाणलोट क्षेत्रावर आधारीत आपल्या कोकणाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास प्रक्रियेत अग्रभागी राहणे हेच आपणा सर्वांचे अंतिम ध्येय आहे.